शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राजकारण म्हणजे पैसा व बळाचे प्रतीक : इरोम शर्मिला, इस्लापूर येथे जीवन गौरव पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 11:36 IST

यापुढील काळातही न्याय आणि शांततेसाठी माझा लढा सुरूच राहील, असा विश्वास मणिपूरच्या आयर्न लेडी व मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराजकारण म्हणजे पैसा व बळाचे प्रतीक : इरोम शर्मिला इस्लापूर येथे जीवन गौरव पुरस्काराने गौरव

इस्लामपूर : यापुढील काळातही न्याय आणि शांततेसाठी माझा लढा सुरूच राहील, असा विश्वास मणिपूरच्या आयर्न लेडी व मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला यांनी व्यक्त केला.

विशेष कायद्याच्या नावाखाली सशस्त्र दलाच्या जवानांकडून निर्दोष लोकांचे बळी घेतले जात होते. मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात होती. माझ्यासह तरुण पिढीबरोबर जे घडत होते, त्याचा राग होता. म्हणून तब्बल सोळा वर्षे उपोषण केले. राजकारण म्हणजे पैसा व बळाचे प्रतीक बनले आहे. या काळात समाजाची साथ नव्हती आणि सरकारकडून माझा आवाज दडपला जात होता. मात्र त्याची मला खंत वाटत नाही,  असे त्या म्हणाल्या.येथील आधार हेल्थ केअर या आरोग्य सेवेचा दुसरा वर्धापन दिन इरोम चानू यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी वाटेगाव (ता. वाळवा) येथील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. शिवलिंग बने यांना इरोम चानू यांच्याहस्ते ह्यजीवन गौरवह्ण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. सतीश गोसावी अध्यक्षस्थानी होते.

यावेळी शर्मिला यांचे पती कुटी न्हो, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, प्रा. चर्चिल सॅमसंग, नगरसेवक संजय कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आधारचे प्रमुख डॉ. योगेश वाठारकर, डॉ. ज्योती वाठारकर, डॉ. पवनसिंह नायकल-पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.येथील कोरेअप्पा नगरमधील माणकेश्वर मल्टिपर्पज हॉलमध्ये इरोम चानू शर्मिला यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या, सशस्त्र दलाच्या जवानांकडून निर्दोेष लोकांचे बळी घेतले जात होते. त्यामुळे या अन्यायी कायद्याविरुद्ध सोळा वर्षे लढा दिला होता. या कालावधित जे राज्यकर्ते होते, ते दिल्लीच्या तालावर कठपुतलीसारखे काम करणारे होते.

माझ्या लढ्याची त्यांच्याकडून दखल घेतली जात नव्हती. माझे समर्थक माझा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनाही दडपले जायचे; मात्र तरीही महात्मा गांधींच्या प्रेरणेने संघर्षात एकाकी पडूनसुद्धा सोळा वर्षे मी लढत राहिले, याचा मला अभिमान वाटतो.इरोम शर्मिला म्हणाल्या, आपण फक्त राजकारणातील वाईट प्रवृत्तींबद्दल बोलतो, लोकप्रतिनिधींविरुद्ध बोलतो; मात्र त्याचवेळी आपल्या इच्छेविरुद्ध काही घडत असताना लोक बोलत नाहीत, त्यामुळे समाजही तितकाच दोषी ठरतो. राजकारण म्हणजे पैसा व बळाचे प्रतीक बनले आहे.

पाण्याचा थेंब तोंडात न घेता सोळा वर्षे मी जगू शकते. त्यामुळे माझ्या जनतेच्या पाठिंब्यावर आणि बळावर मणिपूरची मुख्यमंत्रीही बनू शकते, असा विश्वास वाटत होता. पण निवडणुकीच्या राजकारणासाठी येथेही पदरी निराशा पडली.

आणखी वाचानिवडणुकीत पराभव झाला तरच लग्न करणार

इरॉम शर्मिला अखेर आज 16 वर्षांनी इरॉम शर्मिलांचे उपोषण संपणारस्वत:ची ओळख निर्माण करताना प्रत्येकाने मानवतेचा विचार करायला हवा. कुटुंब आणि समाजात प्रेमाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. वाईट प्रवृत्तींविरुद्ध संघर्ष करताना एकटे राहावे लागते, याची जाणीव ठेवायला हवी. नव्या पिढीतील मुलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे, पदव्या घ्याव्यात, मात्र समाजाप्रती आपण काही तरी देणे लागतो, ही भावना मनी बाळगली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.यावेळी जिल्हा बॅँकेचे संचालक सी. पी. पाटील, डॉ. अमृत पाटील, उद्योजक एस. आर. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, माजी मुख्याध्यापक नि. रा. हिणवार, प्रवीण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. सुनील पाटील यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयSangliसांगली