शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

राजकारण म्हणजे पैसा व बळाचे प्रतीक : इरोम शर्मिला, इस्लापूर येथे जीवन गौरव पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 11:36 IST

यापुढील काळातही न्याय आणि शांततेसाठी माझा लढा सुरूच राहील, असा विश्वास मणिपूरच्या आयर्न लेडी व मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराजकारण म्हणजे पैसा व बळाचे प्रतीक : इरोम शर्मिला इस्लापूर येथे जीवन गौरव पुरस्काराने गौरव

इस्लामपूर : यापुढील काळातही न्याय आणि शांततेसाठी माझा लढा सुरूच राहील, असा विश्वास मणिपूरच्या आयर्न लेडी व मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला यांनी व्यक्त केला.

विशेष कायद्याच्या नावाखाली सशस्त्र दलाच्या जवानांकडून निर्दोष लोकांचे बळी घेतले जात होते. मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात होती. माझ्यासह तरुण पिढीबरोबर जे घडत होते, त्याचा राग होता. म्हणून तब्बल सोळा वर्षे उपोषण केले. राजकारण म्हणजे पैसा व बळाचे प्रतीक बनले आहे. या काळात समाजाची साथ नव्हती आणि सरकारकडून माझा आवाज दडपला जात होता. मात्र त्याची मला खंत वाटत नाही,  असे त्या म्हणाल्या.येथील आधार हेल्थ केअर या आरोग्य सेवेचा दुसरा वर्धापन दिन इरोम चानू यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी वाटेगाव (ता. वाळवा) येथील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. शिवलिंग बने यांना इरोम चानू यांच्याहस्ते ह्यजीवन गौरवह्ण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. सतीश गोसावी अध्यक्षस्थानी होते.

यावेळी शर्मिला यांचे पती कुटी न्हो, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, प्रा. चर्चिल सॅमसंग, नगरसेवक संजय कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आधारचे प्रमुख डॉ. योगेश वाठारकर, डॉ. ज्योती वाठारकर, डॉ. पवनसिंह नायकल-पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.येथील कोरेअप्पा नगरमधील माणकेश्वर मल्टिपर्पज हॉलमध्ये इरोम चानू शर्मिला यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या, सशस्त्र दलाच्या जवानांकडून निर्दोेष लोकांचे बळी घेतले जात होते. त्यामुळे या अन्यायी कायद्याविरुद्ध सोळा वर्षे लढा दिला होता. या कालावधित जे राज्यकर्ते होते, ते दिल्लीच्या तालावर कठपुतलीसारखे काम करणारे होते.

माझ्या लढ्याची त्यांच्याकडून दखल घेतली जात नव्हती. माझे समर्थक माझा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनाही दडपले जायचे; मात्र तरीही महात्मा गांधींच्या प्रेरणेने संघर्षात एकाकी पडूनसुद्धा सोळा वर्षे मी लढत राहिले, याचा मला अभिमान वाटतो.इरोम शर्मिला म्हणाल्या, आपण फक्त राजकारणातील वाईट प्रवृत्तींबद्दल बोलतो, लोकप्रतिनिधींविरुद्ध बोलतो; मात्र त्याचवेळी आपल्या इच्छेविरुद्ध काही घडत असताना लोक बोलत नाहीत, त्यामुळे समाजही तितकाच दोषी ठरतो. राजकारण म्हणजे पैसा व बळाचे प्रतीक बनले आहे.

पाण्याचा थेंब तोंडात न घेता सोळा वर्षे मी जगू शकते. त्यामुळे माझ्या जनतेच्या पाठिंब्यावर आणि बळावर मणिपूरची मुख्यमंत्रीही बनू शकते, असा विश्वास वाटत होता. पण निवडणुकीच्या राजकारणासाठी येथेही पदरी निराशा पडली.

आणखी वाचानिवडणुकीत पराभव झाला तरच लग्न करणार

इरॉम शर्मिला अखेर आज 16 वर्षांनी इरॉम शर्मिलांचे उपोषण संपणारस्वत:ची ओळख निर्माण करताना प्रत्येकाने मानवतेचा विचार करायला हवा. कुटुंब आणि समाजात प्रेमाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. वाईट प्रवृत्तींविरुद्ध संघर्ष करताना एकटे राहावे लागते, याची जाणीव ठेवायला हवी. नव्या पिढीतील मुलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे, पदव्या घ्याव्यात, मात्र समाजाप्रती आपण काही तरी देणे लागतो, ही भावना मनी बाळगली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.यावेळी जिल्हा बॅँकेचे संचालक सी. पी. पाटील, डॉ. अमृत पाटील, उद्योजक एस. आर. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, माजी मुख्याध्यापक नि. रा. हिणवार, प्रवीण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. सुनील पाटील यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयSangliसांगली